थंडीची लाट 19 डिसेंबरपर्यंत राहणार हवामान विभागाचा अंदाज
हवामान विभागाचा नवा अंदाज, अहिल्यानगरचा पारा 9.5 अंशावर टिकून
बंगालच्या उपसागरात सेन-यार व दिट-वाह अश्या दोन चक्रीवादळांची निर्मिती होऊनही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चढ-उतारासहित 7 डिसेंबर संकष्ट चतुर्थीपर्यंत महाराष्ट्रात अपेक्षित थंडी अनुभवली गेली. आता पुढील 12 दिवस म्हणजे 19 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, खान्देश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात रात्री व दिवसा हुडहुडी जाणवणार आहे.

राज्यातील थंडीबाबत पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, सध्याची मालेगाव (नाशिक) येथे किमान तापमान 9 अंश तर कमाल तापमान 26.8 आहे. तर अमरावती, यवतमाळ, गोंदिया, वाशिम जिल्ह्यात थंडीची लाट आहे. तर एकांकी किमान तापमान व केवळ जाणवणारी थंडी ही अहिल्यानगर 9.5, जळगाव 9.4, जेऊर 9, छत्रपती संभाजीनगर 10, नांदेड 9.9, नागपूर 9.6 अंश आहे. उत्तर भारतातून येणारे ईशान्यई वारे महाराष्ट्रात पूर्वीय होत असून हवेचा दाब ही पूर्ववत म्हणजे 1016







